देश

समुद्राची गाज ऐकत प्रवास करा! मुंबई ते सिंधुदुर्ग फक्त 5 तासांत, कोकणसाठी गेमचेंजर ठरणार ‘हा’ सागरी मार्ग

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि कोकणपर्यंतचा प्रवास अवघ्या 4 तासांत पूर्ण होणार आहे. सरकारकडून या महामार्गाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. या महामार्गामुळं प्रवाशांना आता कमी वेळातच कोकणात पोहोचता येणार आहे. इतकंच नव्हे तर कोकणचं निसर्गसौंदर्यदेखील अनुभवता येणार आहे. कोकणच्या निसर्गाचा आनंद घेत आता तुम्हाला गाव गाठता येणार आहे. 

नवीन अॅक्सेस कंट्रोल रस्त्यामुळं कोकणचा कायापालट होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसंच, कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर 9 ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवावी असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

कोकणात प्रस्तावित असलेल्या कोकण द्रुतगती एक्सेस कंट्रोल महामार्गाचा कामाला गती देण्यास सांगितले. या महामार्गामुळे मुंबई आणि सिंधुदुर्ग हे अंतर 4 ते 5 तासांत पार करता येणार आहे. दोन्ही जिल्हे अधिक जवळ येतील तसेच कोकणात जलद पोहोचणे शक्य होईल. मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या महामार्गाबरोबरच आता आणखी एक महामार्ग नागरिकांच्या सेवेत येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाकडून या प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे. रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातून जाणार आहे. तसंच, निसर्गरम्य परिसरातून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळं प्रवासाचा वेग तर वाढणार आहेच पण त्याचबरोबर कोकणचं समृद्ध वैभवदेखील नागरिकांना अनुभवता येणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग किनारपट्टीजवळूनच हा सागरी किनारा महामार्ग जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Related Articles

Back to top button