PM Modi : पक्क घर फक्त रामरायाला नाही तर देशातील 4 कोटी लोकांनाही मिळालं, पंतप्रधान मोदींचे अयोध्येत संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवार 30 डिसेंबर रोजी अयोध्येचा (Ayodhya) दौरा केला. यावेळी त्यांनी अयोध्येतील रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले, तसेच त्यांनी वंदे भारत (Vande Bharat Train) आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या लोकार्पणाच्या सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित देखील केले. यावेळी त्यांनी म्हटलं की, मागील 9 वर्षात भारताने पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा विश्वस्तरावर अभूतपूर्व विस्तार केलाय. त्यामुळे फक्त रामरायालाच नाही तर देशातील 4 कोटी लोकांना पक्की घरं मिळाली आहेत.
अयोध्येतील विविध विकास कामांचे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील विविध कामांचे देखील लोकार्पण केले. यावर त्यांनी म्हटलं की, राममय असलेल्या अयोध्या धाममध्ये आज विविध विकास कामांचे लोकार्पण आणि शिलान्यास करुन मला अभिमान वाटत आहे.
22 जानेवारी संपूर्ण जगाला उत्सुकता – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्यावासीयांमध्ये हा जल्लोष आणि उत्साह स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील लोकांचा पूजक आहे आणि मलाही तुमच्यासारखाच जिज्ञासू आहे.
4 कोटी लोकांना मिळाली पक्की घरं – पंतप्रधान मोदी
एक वेळ अशी होती की अयोध्येमध्ये रामलल्ला तंबूत राहत होता. आता रामाला त्याचं पक्क घरं मिळालं आहे. पण फक्त रामरायालाच नाही कर देशातील 4 कोटी गरीब जनतेला देखील पक्की घरं मिळाली आहेत. आज आम्ही प्रत्येक घरात पाणी पोहोचवत आहोत. देशात केवळ महाकाल महालोकाचीच निर्मिती झाली नाही, तर प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी 2 लाखांहून अधिक पाण्याच्या टाक्याही बांधल्या गेल्या आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले