देश

Weather Alert : राज्यात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा

मान्सून राज्यात सक्रीय झाला आहे. (Monsoon active in Maharashtra) अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसासह अतिवृष्टी (Heavy Rains) होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने  (Weather Alert )  दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज मान्सूनचे आगमन झाले. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस (Mumbai Rain)  झाल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. कोकणातही मुसळधार पावसासह ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईची दाणादाण, मुंबईकरांचे असे हाल 

तर दुसरीकडे  कोकणात (Konkan) ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (Weather Alert ) अंदाज वर्तवल्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस महत्वाचे आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार पाऊस कोसळत आहे. (Heavy Rains in Ratnagiri) रत्नागिरी जिल्ह्यात 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस ढगफुटीप्रमाणे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी खबरदारीचा आदेश दिला आहे.

Related Articles

Back to top button