देश

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. राज्यातील महाराष्ट्र बोर्डाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना थेट पास करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच 9 वी आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button